Sunday, October 26, 2008

जो जे वांछिल...

शनिवारी नाशिकमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढविला. ही बातमी अनेक अर्थांनी महत्वाची. 'जिहादी' अतिरेक्यांना प्रत्युत्तर म्हणून तद्दन भंपक, देशाच्या एकतेला मारक मार्ग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीप्रमाणे वापरत आहे का, या मुळ प्रश्नाभोवती ही बातमी फिरणं खरंतर आवश्यक. मालेगाव बॉम्बस्फोटात संघाशी संबंधित लोक सामील होते का, या प्रश्नाचं उत्तर शोधणं आणि ते लोकांसमोर आणणं किती आवश्यक आहे, नाही शोधलं तर काय होऊ शकतं, याची झलक या बातमीतून दिसणं अपेक्षित होतं. 

प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या चार प्रमुख वृत्तपत्रांत कशी प्रसिद्ध झालीय ही बातमी? 'लोकसत्ता', 'महाराष्ट्र टाईम्स', 'लोकमत' आणि 'सकाळ' या दैनिकांतील बातम्यांचा तपशील वाचला, तर हे सहज लक्षात येईल, की 'जो जे वांछिल...' अशीच बातमी आलीय...!

उदाहरणार्थ 'लोकसत्ता'मध्ये रोख रकमेची चोरी, काही नावं आहेत, जी इतरत्र नाहीत. 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये मुस्लिम तरुणांचा उल्लेख आहे. 'सकाळ'मध्ये तोंडाला फडके लावलेल्या कार्यकर्त्यांचा उल्लेख आहे आणि 'लोकमत'मध्ये यापैकी बराच तपशील नाहीच आहे...!

तर...असं एकूण आहे...

मुळ बातम्या वाचा:

No comments: